Sunday, October 1, 2017

A Girl In Metro City

                                           
मुंबई बद्दल बोलायचं म्हटलं तर कळत नाही नेमकं कुठून सुरवात करू? मुंबईन दिल काय मला? साध सरळ आयुष्य होत माझं सांगली मधल. शाळा, कॉलेज, मित्र-मैत्रिणी, सगळं काही व्यवस्थित तर चालू होत. कमी नव्हती कशाचीच. पण म्हणतात ना, आयुष्य हे Signal सारखं असत. कधी Green Signal तर कधी Red. सतत Green Signal ची अपेक्षा करणच व्यर्थ आहे.
तसंच काहीस झालं आयुष्यात, आयुष्याच एक वळण मुंबई मध्ये येऊन थांबलं. पण ज्या वळणावर फुलांच्या पायवाटेची स्वप्न पहिली होती, तिथं काटेरी पायऱ्यांची चढण लागली एकापाठोपाठ एक. इतका त्रास, इतकी दुःख कधी पाहिलीच नव्हती. त्या मानानं सांगली मधलं आयुष्य खूप सुखी होत, सुरक्षित होत. या दुःखातून स्वतःला कस बाहेर काढू म्हणेपर्यंत दुसरं दुःख समोर उभं राहायचं. आयुष्यातले असे कितीतरी न मोजता येण्यासारखे दिवस आहेत कि त्या वेळी फक्त आणि फक्त अश्रू होते सोबतीला. 7-8 महिने तरी याच Depression मध्ये घालवलेत कि या सगळ्यातून कधी बाहेर तरी पडू शकेन कि नाही, पण Show Must Go On. अर्थात हा Show नसून हि Life आहे हे तोपर्यंत कळून चुकलेलं. ज्यांनी त्रास दिला त्यांना काही न वाटता ते निवांत जगत आहेत. मग मी का स्वतःला त्रास करून घ्यावा? If I Am Not Guilty Then Why Should I Worried About What Happened?
आणि त्या वेळी एक Positive Source आला Life मध्ये, ज्यानं माझं Life पूर्णपणे बदलून गेलं. मी व्यर्थच Negativity चा Red Signal आयुष्यात आणून ठेवला होता. I Am Not A Looser To Give Up.
I Left That Past. तो भूतकाळच पुसून टाकला मी आयुष्यातून. वहीची नको असलेली पान वहीतून काढून टाकतो ना आपण तसं. पुन्हा जी पान बघावीच लागणार नाही आहेत ती वहीत ठेवून फायदा तरी काय? जर कोणी माझ्या Life चा Part असणं Deserve च करत नसेल तर असे लोक Life मधून गेल्यावर उलट चांगलंच आहे कि. Infact माझं Life Happy झालं असे लोक गेल्यावर Life मधून. नव्या आयुष्याची सुरवात झाली माझ्या. एक खूप छान आयुष्य. स्वतःचीच नव्यानं ओळख झाल्यासारखी मी स्वतःला नव्यानं भेटले. मला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास मिळाला तेव्हा. आपण स्वतःच्या हिमतीवर सगळं काही करू शकतो हि भावनाच इतकी सुंदर होती कि मग पुढचं सगळं आपोआप सुंदर होत गेलं. माझ्या Positive Source न मला हे पटवून दिल कि Never Give Up.
आधी सगळ्या गोष्टीत Negative विचार करणारी मी, आता प्रत्येक गोष्टीचा Positively विचार करायला शिकले. एकटीनेच संध्याकाळी तळ्याकाठी फिरायला जाणं. बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या मुसळधार सरी बघत Enjoy केलेली मस्त Coffee, एकटीनं रमत गमत केलेली ती Shopping सगळं काही आता हवंहवस वाटू लागलं होत. I Am A Confident & Independent Girl Now. हा सगळा बदल कसा झाला? Just Because Of My Positive Source. जेव्हा पूर्णपणे Depression मध्ये होते त्यातून बाहेर येण्यासाठी एक जुना छंद पुन्हा नव्यानं लावून घेतला स्वतःला. “वाचन”. पहिल्यापासून वाचनाची आवड होती पण इथे आल्यापासून जे काही बरे वाईट प्रसंग घडले ना, तेव्हापासून हा छंद पण निसटला होता हातातून. जो कितीतरी दिवसांनी मी पुन्हा जोपासला. आणि या वाचनातूनच मिळाला मला माझा Positive Source. "कर्ण"…."राधेय". सर्वांसाठी जरी तो महाभारतातील एक पात्र असला, तरी माझ्यासाठी तो माझा माझा Life Source आहे. माझ्या जगण्याचा स्त्रोत आहे.
त्याची किती पुस्तक वाचली असतील याची गणनाच नको करायला, पण तरीही प्रत्येक पुस्तकातून तो मला नव्यानं भेटला. नव्यानं काहीतरी देत राहिला. माझं आयुष्य मला परत मिळालं त्याच्या रूपानं. त्यानं शिकवलं कि आयुष्यात कधीही हार नाही मानायची. दुःख येतात ती आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातात. प्रत्येक दुःखात माणसाची कसोटी लागते आणि ती कसोटी माणसाला अजूनच महान बनवते. माझ्या आयुष्याचा खरा अर्थ मला कर्णान दिला. आयुष्य जगायला शिकवलं राधेयान. आज मी जे काही आहे त्या सर्वाचं श्रेय फक्त आणि फक्त कर्णाला जात. आजही 3 वर्ष मागे पाहिल्यावर मला ती वृषाली कुठेच दिसत नाही, जी आता आपलं काही भल होणार नाही म्हणून रडत बसली होती. I Just Changed A Lot.
मुंबईन काय दिल? मुंबईन एक असा Source दिला ज्यामुळं मी आत्मविश्वासानं जगायला शिकले. खडतर परिस्थितीमध्ये लढायला शिकले. Yes I Am Free, I Am Independent & I Am Happy Now, खूप छान आयुष्य आहे आता माझं. माझा Job, माझी माणसं, आणि प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत माझी साथ देणारा राधेय. आधी जेव्हा कोणीही विचारायचं कशी आहे मुंबई? एकच उत्तर असायचं माझं, आयुष्य Spoil केलं मुंबईन माझं. But Now . . . . . I Must Say Honestly,
ज्यामुळं आयुष्य बदलून गेलं असा माझ्या जगण्याचा Source दिला Metro City न,
ज्यानं मला ताठ मानेन जगायला शिकवलं,
प्रत्येक संकटांचा सामना करायला शिकवलं,
आयुष्याच्या कोणत्याच वळणावर त्यानं माझी साथ कधीच सोडली नाही,
माझ्यातल्या मी पणाची जाणीव करून दिली, आणि सगळ्यात महत्वाचं ,
आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं मला कर्णान. खूप Happy आहे आता मी माझ्या Life मध्ये. प्रेम करायला शिकले नव्यानं आयुष्यावर . . .
. . . . . Love You Zindgi . . . . .
                                
© वृषाली

Sunday, April 2, 2017

ग्रेस

भय इथले संपत नाही ही कवि ग्रेस यांची माझी अतिशय आवडती कविता. कवितेचा अर्थ ग़ूढ आहे, पण ती जितकी समजुन घेत जाते तितकी नव्यानं या कवितेच्या प्रेमात पड़त जाते. कवि ग्रेस यांना दुःखाचा महाकवी म्हणतात, त्यांची कविता समजुन घ्यायची म्हणजे अगदी त्याच दुःख- वेदनेच्या पातळीवर जाऊन त्याना समजुन घ्याव लागेल. मी काही त्यांच्या इतकी मोठी कवयित्री नाही पण मला त्यांच्या कविता खूप आवडतात म्हणून मी माझ्या परीनं या कवितेच्या चार ओळींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. हा माझा प्रयत्न माझ्या प्रिय कविला मी वाहिलेली छोटीशी मानवंदना आहे.
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते . . . . .
एकाकी असलेल्या माझ्या जगामध्ये आता फक्त दुःख उरले आहे, अन या दुःखाचे भय कधीही न संपणारे आहे. अशा वेळी मला तुझी आठवण येते आणि तुझ्या आठवणीत माझ्या एकाकीपणाची दुःख घालवण्यासाठी मी गाणी गातो, ती गाणी जी तू मला शिकवलीस, एका परीनं त्या गाण्यांच्या रूपात मी तुला आठवत राहतो. माझा एकाकीपणा कमी करायचा एक निष्फळ प्रयत्न मी करतो.
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया . . . . .
.
धरती वर पडणारे चांदण्यांचे झरे, ते नुसते झरे नाहीत तर निद्रिस्थ पृथ्वीला पडलेली शुभ्र शीतल स्वप्नांची माळा आहे. या धरतीची माया देखील विलक्षण आहे, आपली सुख-दुःख, आनंद-अश्रू , सगळं काही सहज सामावून घेते ती. त्याच मातीत आता मला मिसळायचे आहे, जिथं आपली सुख दुःख एकरूप झाली त्याच मातीत पुन्हा उगवण्यासाठी मला पुन्हा तीत मिसळायचे आहे. त्या धरतीच ऋण थोडस का होईना उतराई व्हायचं आहे आता.
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला . . . . .
तुझे ते हळुवार बोल, अवघ जीवन भरून गेलंय माझं त्या बोलांनी. वनवासात असलेल्या सीतेला रामाच्या शेल्याची सोबत होती. त्या शेल्याच्या रूपात ती जणू श्रीरामालाच पाहत होती. तिच्या एकाकी पणात देखील कुठे ना कुठे श्रीराम होते. अगदी तसेच माझ्या एकाकीपणात तुझ्या शब्दांची, तुझ्या बोलांची मला सोबत आहे, माझ्या एकटेपणाच दुःख काहीस त्या सीतेसारखंच आहे, तुझ्या शब्दांनी मात्र आयुष्य व्यापून गेलय माझं. त्यांचीच सोबत उरलीय आता.
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे . . . . . .
एखाद्या भाविकान अखंड ईश्वराचा जप करावा, त्याची स्तोत्र गावीत त्याप्रमाणे मी देखील माझीच दुःख आळवत असतो, कधी मूक अश्रूंच्या रूपात, कधी अबोल अव्यक्त शब्दात ती व्यक्त करत राहतो, पण त्या दुःखाच्या गडद काळोखातही तुझ्या आठवणींचा चांदणप्रकाश माझ्या सोबत असतो. ते चांदणे कधीही माझी साथ सोडत नाही. प्रत्येक क्षणात तूच असल्याचा भास सतत करून देत ते, त्या चांदण्यांप्रमाणेच तुझ्या आठणीही कधीही न संपणाऱ्या आहेत. . . .
                                                                                                                 
© वृषाली 

. . . . कर्ण . . . .

                                                           
                     

      कर्णाबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच. मृत्युंजय वाचताना हे कधीच वाटलं नव्हतं कि हे पुस्तक आपलं सगळ्यात आवडीचं पुस्तक बनेल. आणि कर्ण कायमचा मनात घर करून राहील. त्याच्या दानशूरतेला तोड नव्हती. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता, सर्वश्रेष्ठ दानवीर होता, आणि एक सर्वश्रेष्ठ व्यक्ती होता. कर्णाबद्दल माहित असलेल्या काही कथांचा संग्रह आज मी तुमच्या पुढे मांडणार आहे. अर्थात या कथांचा संग्रह मी काही मित्र मैत्रिणी, Google, Facebook इत्यादी माध्यमातून केलाय. तुम्हालाही त्या आवडतील अशी अपेक्षा करते.

१.    एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते. अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ  दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही? लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला,
हे सगळे सोने गावकरयांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
   
       अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की मी प्रत्येक गावकरयांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.आता अर्जुन अगदी दमून गेला होता.पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.
शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!आता यापुढे मी काम करू शकत नाही.
   
        मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की......." या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या". लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकरयांना बोलवले आणि सांगितले की....." या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत". एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.
लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जुन चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही.....
या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.
   
        कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला "अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!" तू गर्वाने प्रत्येक.......
गावक-याला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!
   
         कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने दान केले आणि तो निघूनही गेला. आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय......
हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
     
         व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे. देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे. शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे, म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते. कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............⁠⁠⁠⁠





२.      एकदा भगवान श्रीकृष्ण अणि अर्जुन गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता कर्णाच्या दानशूरपणाविषयी बोलणे चालू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाला, ”कर्णाइतकी उदार व्यक्ती दुसरी कुणीही नाही.” या बोलण्याचे अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटले. अर्जुन म्हणाला, ”श्रीकृष्णा, धर्मराजही दानशूर आहे.” सर्वांत अधिक दानशूर कोण आहे ? यावर मग त्यांची चर्चा चालू झाली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणेच याही गोष्टीची प्रचीती आणून देण्यासाठी सिद्ध होता. श्रीकृष्ण म्हणाला, ”ठीक आहे, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.”

        पावसाळयाचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी उजाडताच श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ”राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे. त्यासाठी लाकडे हवी आहेत.” धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून. धर्मराज म्हणाला, ”काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ?” सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले.
     
       त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, “एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?” असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ”कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?” त्यावर कर्ण उद्गारला, ” या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?”

     दान देताना सुद्धा त्याने मनात किंचितही कौतुकाची अपेक्षा ठेवली नाही अशा या जेष्ठ दानवीराला माझे कोटी कोटी प्रणाम





                                      कर्णाविषयी प्रकाशित काही पुस्तके जी अवश्य वाचली पाहिजेत

     १. मृत्युंजय  -  शिवाजी सावंत

     २. राधेय  -  रणजीत देसाई

     ३. कौंतेय  -  वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)

     ४. धर्मयुद्ध  -  डॉ. रवींद्र ठाकूर

     ५. श्री कर्णायन  -   गो. नी. दांडेकर

     ६. कर्णपर्व  -  डॉ. रवींद्र ठाकूर

     ७. कर्ण  -  अनंत पै

     ८. शोध कर्णाचा  -  डॉ. श्रीराम पंडित


© वृषाली