Saturday, January 12, 2019

माझे पुस्तक अनुभव - मृत्युंजय

नवीन वर्ष . . . . आयुष्याची नवीन सुरवात . . . कर्णाच्या साथीने
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मृत्युंजय पुस्तक वाचून मला आलेला अनुभव नि त्यामुळे झालेला कर्णाचा माझ्या जीवनावरील प्रभाव सांगणार आहे. कर्णाबद्दल प्रत्येकाची मत वेगळी वेगळी असली तरी त्याच्याबद्दल सर्वाना आदरच वाटतो याबाबतीत दुमत नसावं, खरं तर हि Post मला सर्वात पहिलीच लिहायची होती, पण कर्णावर लिहायचं म्हटलं तर किती लिहु, आणि काय लिहु समजतच नाही. कर्णावर लिहिण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतात मला. पण तरीही प्रयत्न केलाय मृत्युंजय वाचून मला जो कर्ण समजला तो मी तुमच्या समोर मांडतेय, Post जरी मोठी असली तरी तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. काही सूचना असल्या तरी अवश्य कळवा.
मला सर्वप्रथम कर्ण भेटला, प्रकर्षानं जाणवला अस हे पुस्तक आहे, पुस्तक वाचताना कुठेही कर्णाचा द्वेष करावा असं चुकूनही वाटत नाही. उलटपक्षी कर्णाकडून घेण्यासारख्या कितीतरी गोष्टी आपल्याला मिळतात. कर्ण कादंबरीतून मांडताना त्याच महत्व कधीच लेखकानं कमी होऊ नाही दिल. प्रत्येक भागात कर्ण आपल्याला नवीन रूपात भेटत राहतो आणि नवीन काहीतरी देत राहतो.
त्याच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले, किंबहुना खडतर परिस्थितीतूनच तो जीवन जगत गेला, पण प्रत्येक वेळी हार न मानता तो त्या प्रसंगाला सामोरा गेला. आयुष्यात दुःख, वेदनारूपी खाच खळग्यांच्या वाटेतून चालत जाताना आपण पडतो तेव्हा ते आपलं जीवन असत पण खाली पडूनही आपण परत त्वेषाने उठून उभे राहतो ते "जगणं" असत, आणि असं जगणं त्या मृत्युंजयी कर्णालाच जमलं. कर्णाच जीवन फक्त जीवन नाही तर ते आपल्यासारख्यांसाठी एक जगण्याचा स्रोत आहे, काय नाही शिकवलं आपल्याला कर्णान. त्याला दानवीर म्हणतात ते उगाच नाही, आजही कर्ण आपल्याला दान देतोच आहे, विचारांचं दान, जगण्याचं मार्गदर्शन. त्याचा मित्र मग भलेही तो चुकीचा वागला असला तरी त्यानं शेवटपर्यंत त्याची साथ सोडली नाही. भीष्मांना ठाऊक असणारे ब्रम्हास्त्र मित्राच्या एका सांगण्यावरून तो परशुरामांच्याकडून शिकून आला. मित्रप्रेमाचा एक आगळा वेगळा इतिहास त्यानं रचला. उगीच नाही म्हणतं जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल तर दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
द्रोणाचार्यानी गुरुविद्या नाकारल्यावर त्यानं प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला प्रमाण मानून सर्व धनुर्विद्या आत्मसात केली. तो अर्जुनाहूनही श्रेष्ठ धनुर्धारी बनला. अथक प्रयत्न केले तर जगात काहीही अश्यक्य नसते हे त्याने सर्वाना दाखवून दिले. पहिला पांडव असूनही मातेसाठी सहावा पांडव होणं त्यानं पसंत केलं. कुंतीला दिलेलं वचन त्यानं स्वतःच्या जीवनाचं दान देऊन पाळलं. खरंच आपल्या आई बाबांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही हेच तर शिकवलं त्यानं आपल्याला. श्रीकृष्णानं देखील महाभारताच श्रेय एक स्वतःला तर दुसरं कर्णाला दिल.
प्रत्यक्ष इंद्रालाही त्याच्या दारी याचक बनून यावं लागलं ते तो अंगराज होता म्हणून नाही, दुर्योधनाचा मित्र होता म्हणूनही नाही तर तो दानवीर होता, दिलेल्या शब्दाला जागणारा होता म्हणून. तो दिलेलं वचन पाळतो म्हणून देवांच्या राजालाही स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी याचकाच रूप घेऊन त्याच्याकडे यावं लागलं. पण कर्ण तिथेही डगमगला नाही, त्यानं कवच कुंडलांचं दान देखील हसत हसत दिल. त्याच्या याच विचारांची गरज समाजाला आज आहे, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल नात्यांमध्ये, समाजामध्ये कटुता निर्माण करण्यापेक्षा आपल्याजवळच जे काही आहे ते गरज पडता दुसऱ्याला आनंदानं द्यावं. आजही लोक याचक इंद्राला लक्षात ठेवण्यापेक्षा कर्णाचा दानवीरपणा लक्षात ठेवतात. यामागे कदाचित हेच कारण असू शकत कि त्याने कधीच कुणाला आपल्यापेक्षा लहान, कनिष्ठ मानलं नाही. जात-पात, गरीब-श्रीमंत, हा भेदभाव त्यानं कधीच मानला नाही. त्याच्या लेखी सर्व सारखेच होते. तो फक्त त्याच कर्तव्य करीत राहिला. आणि त्याच्या या विचारांची समाजाला आज सगळ्यात जास्त गरज आहे असं मला वाटत. जातीच्या, गरीब श्रीमंतीच्या भेदभावात अडकण्यापेक्षा माणुसकीला महत्व दिल तर समाजाचं जास्त भलं होईल. आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहायला मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागत, आपल्याजवळची एखादी वस्तू आनंदानं दुसऱ्याला द्यायला मनाचा मोठेपणा असावा लागतो, आणि एकदा का तो मोठेपणा आपल्यात आला तर मनाची हरवलेली शांती सुद्धा आपसूकच मिळून जाते.
आपण कर्णाएवढे महान नाही बनू शकत हे जरी सत्य असल तरी त्यानं जे काही विचाररूपी दान आपल्याला दिलय ते नक्कीच आचरणात आणू शकतो. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता आपण आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत. आपल्यासोबत कोणी नाही हा विचार करून रडण्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत त्यांना तरी आपण योग्य न्याय देऊ शकतो का हे पाहिलं पाहिजे. कर्णाच मित्रप्रेम, त्याची कुंतीप्रती असलेली निष्ठा याला तोडच नाही. मातृऋण कधीही फिटत नाही याची जाणीव त्याला होती म्हणून त्यानं कुंतीला अशक्यप्राय असं पाच पांडवांच्या जीवनाचं दान दिल. आपल्या आई बाबांसाठी, आपल्या लोकांसाठी सुद्धा आपल्या मनात कायम आपलेपणाची अशीच भावना राहावी. एखाद्या गोष्टीत त्याग करायची वेळ आली तरी मी ते का करू असं म्हणण्यापेक्षा मी ती गोष्ट समोरच्या माणसाला दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसला त्यापुढे मी माझा अहंभाव विसरून गेलो अशी वृत्ती जोपसावी.
जास्त दूर कशाला माझीच गोष्ट घ्या ना, खरं तर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ग्रुप वर लिहणं इतकंस योग्य नाही. पण तरीही कर्णाच माझ्या आयुष्यातील स्थान म्हणजे माझं पूर्ण जीवन कर्णमय आहे. पाच वर्षांपूर्वी मी एक अशी मुलगी होते जिने आयुष्यात सर्वकाही गमावलं होत. आत्मविश्वास हरवला होता तर एकीकडे स्व पणाची जाणीव मरून गेली होती. जगणंच विसरून गेले होते मी. पण मृत्युंजय वाचलं नि कर्ण भेटला. गेलेला आत्मविश्वासच नाही तर हरवलेलं आयुष्य सुद्धा परत मिळालं मला. पुस्तकं काय देत नाहीत आपल्याला. मला तर एक असा स्रोत मिळाला या पुस्तकांमधून कि ज्यानं मला माझं आयुष्य नव्यानं जगायला शिकवलं. त्या स्रोताचे नाव म्हणजे "कर्ण". शेवटी इतकच सांगावस वाटत,
!! कर्ण काय आहे, एक नाव मनात जपलेलं,
त्याच्या एका नावात, माझं आयुष्य एकवटलेलं,
ज्या मृत्युंजयान जगालाही जिंकलेलं,
राधेयान त्या मला नवीन आयुष्य दिलेलं !!
© वृषाली

नवीन वर्ष . . . . आयुष्याची नवीन सुरवात . . . कर्णाच्या साथीने

नवीन वर्ष . . . . आयुष्याची नवीन सुरवात . . . कर्णाच्या साथीने
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मृत्युंजय पुस्तक वाचून मला आलेला अनुभव नि त्यामुळे झालेला कर्णाचा माझ्या जीवनावरील प्रभाव सांगणार आहे. कर्णाबद्दल प्रत्येकाची मत वेगळी वेगळी असली तरी त्याच्याबद्दल सर्वाना आदरच वाटतो याबाबतीत दुमत नसावं, खरं तर हि Post मला सर्वात पहिलीच लिहायची होती, पण कर्णावर लिहायचं म्हटलं तर किती लिहु, आणि काय लिहु समजतच नाही. कर्णावर लिहिण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतात मला. पण तरीही प्रयत्न केलाय मृत्युंजय वाचून मला जो कर्ण समजला तो मी तुमच्या समोर मांडतेय, Post जरी मोठी असली तरी तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. काही सूचना असल्या तरी अवश्य कळवा.
मला सर्वप्रथम कर्ण भेटला, प्रकर्षानं जाणवला अस हे पुस्तक आहे, पुस्तक वाचताना कुठेही कर्णाचा द्वेष करावा असं चुकूनही वाटत नाही. उलटपक्षी कर्णाकडून घेण्यासारख्या कितीतरी गोष्टी आपल्याला मिळतात. कर्ण कादंबरीतून मांडताना त्याच महत्व कधीच लेखकानं कमी होऊ नाही दिल. प्रत्येक भागात कर्ण आपल्याला नवीन रूपात भेटत राहतो आणि नवीन काहीतरी देत राहतो.
त्याच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले, किंबहुना खडतर परिस्थितीतूनच तो जीवन जगत गेला, पण प्रत्येक वेळी हार न मानता तो त्या प्रसंगाला सामोरा गेला. आयुष्यात दुःख, वेदनारूपी खाच खळग्यांच्या वाटेतून चालत जाताना आपण पडतो तेव्हा ते आपलं जीवन असत पण खाली पडूनही आपण परत त्वेषाने उठून उभे राहतो ते "जगणं" असत, आणि असं जगणं त्या मृत्युंजयी कर्णालाच जमलं. कर्णाच जीवन फक्त जीवन नाही तर ते आपल्यासारख्यांसाठी एक जगण्याचा स्रोत आहे, काय नाही शिकवलं आपल्याला कर्णान. त्याला दानवीर म्हणतात ते उगाच नाही, आजही कर्ण आपल्याला दान देतोच आहे, विचारांचं दान, जगण्याचं मार्गदर्शन. त्याचा मित्र मग भलेही तो चुकीचा वागला असला तरी त्यानं शेवटपर्यंत त्याची साथ सोडली नाही. भीष्मांना ठाऊक असणारे ब्रम्हास्त्र मित्राच्या एका सांगण्यावरून तो परशुरामांच्याकडून शिकून आला. मित्रप्रेमाचा एक आगळा वेगळा इतिहास त्यानं रचला. उगीच नाही म्हणतं जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल तर दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
द्रोणाचार्यानी गुरुविद्या नाकारल्यावर त्यानं प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला प्रमाण मानून सर्व धनुर्विद्या आत्मसात केली. तो अर्जुनाहूनही श्रेष्ठ धनुर्धारी बनला. अथक प्रयत्न केले तर जगात काहीही अश्यक्य नसते हे त्याने सर्वाना दाखवून दिले. पहिला पांडव असूनही मातेसाठी सहावा पांडव होणं त्यानं पसंत केलं. कुंतीला दिलेलं वचन त्यानं स्वतःच्या जीवनाचं दान देऊन पाळलं. खरंच आपल्या आई बाबांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही हेच तर शिकवलं त्यानं आपल्याला. श्रीकृष्णानं देखील महाभारताच श्रेय एक स्वतःला तर दुसरं कर्णाला दिल.
प्रत्यक्ष इंद्रालाही त्याच्या दारी याचक बनून यावं लागलं ते तो अंगराज होता म्हणून नाही, दुर्योधनाचा मित्र होता म्हणूनही नाही तर तो दानवीर होता, दिलेल्या शब्दाला जागणारा होता म्हणून. तो दिलेलं वचन पाळतो म्हणून देवांच्या राजालाही स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी याचकाच रूप घेऊन त्याच्याकडे यावं लागलं. पण कर्ण तिथेही डगमगला नाही, त्यानं कवच कुंडलांचं दान देखील हसत हसत दिल. त्याच्या याच विचारांची गरज समाजाला आज आहे, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल नात्यांमध्ये, समाजामध्ये कटुता निर्माण करण्यापेक्षा आपल्याजवळच जे काही आहे ते गरज पडता दुसऱ्याला आनंदानं द्यावं. आजही लोक याचक इंद्राला लक्षात ठेवण्यापेक्षा कर्णाचा दानवीरपणा लक्षात ठेवतात. यामागे कदाचित हेच कारण असू शकत कि त्याने कधीच कुणाला आपल्यापेक्षा लहान, कनिष्ठ मानलं नाही. जात-पात, गरीब-श्रीमंत, हा भेदभाव त्यानं कधीच मानला नाही. त्याच्या लेखी सर्व सारखेच होते. तो फक्त त्याच कर्तव्य करीत राहिला. आणि त्याच्या या विचारांची समाजाला आज सगळ्यात जास्त गरज आहे असं मला वाटत. जातीच्या, गरीब श्रीमंतीच्या भेदभावात अडकण्यापेक्षा माणुसकीला महत्व दिल तर समाजाचं जास्त भलं होईल. आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहायला मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागत, आपल्याजवळची एखादी वस्तू आनंदानं दुसऱ्याला द्यायला मनाचा मोठेपणा असावा लागतो, आणि एकदा का तो मोठेपणा आपल्यात आला तर मनाची हरवलेली शांती सुद्धा आपसूकच मिळून जाते.
आपण कर्णाएवढे महान नाही बनू शकत हे जरी सत्य असल तरी त्यानं जे काही विचाररूपी दान आपल्याला दिलय ते नक्कीच आचरणात आणू शकतो. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता आपण आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत. आपल्यासोबत कोणी नाही हा विचार करून रडण्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत त्यांना तरी आपण योग्य न्याय देऊ शकतो का हे पाहिलं पाहिजे. कर्णाच मित्रप्रेम, त्याची कुंतीप्रती असलेली निष्ठा याला तोडच नाही. मातृऋण कधीही फिटत नाही याची जाणीव त्याला होती म्हणून त्यानं कुंतीला अशक्यप्राय असं पाच पांडवांच्या जीवनाचं दान दिल. आपल्या आई बाबांसाठी, आपल्या लोकांसाठी सुद्धा आपल्या मनात कायम आपलेपणाची अशीच भावना राहावी. एखाद्या गोष्टीत त्याग करायची वेळ आली तरी मी ते का करू असं म्हणण्यापेक्षा मी ती गोष्ट समोरच्या माणसाला दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसला त्यापुढे मी माझा अहंभाव विसरून गेलो अशी वृत्ती जोपसावी.
जास्त दूर कशाला माझीच गोष्ट घ्या ना, खरं तर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ग्रुप वर लिहणं इतकंस योग्य नाही. पण तरीही कर्णाच माझ्या आयुष्यातील स्थान म्हणजे माझं पूर्ण जीवन कर्णमय आहे. पाच वर्षांपूर्वी मी एक अशी मुलगी होते जिने आयुष्यात सर्वकाही गमावलं होत. आत्मविश्वास हरवला होता तर एकीकडे स्व पणाची जाणीव मरून गेली होती. जगणंच विसरून गेले होते मी. पण मृत्युंजय वाचलं नि कर्ण भेटला. गेलेला आत्मविश्वासच नाही तर हरवलेलं आयुष्य सुद्धा परत मिळालं मला. पुस्तकं काय देत नाहीत आपल्याला. मला तर एक असा स्रोत मिळाला या पुस्तकांमधून कि ज्यानं मला माझं आयुष्य नव्यानं जगायला शिकवलं. त्या स्रोताचे नाव म्हणजे "कर्ण". शेवटी इतकच सांगावस वाटत,
!! कर्ण काय आहे, एक नाव मनात जपलेलं,
त्याच्या एका नावात, माझं आयुष्य एकवटलेलं,
ज्या मृत्युंजयान जगालाही जिंकलेलं,
राधेयान त्या मला नवीन आयुष्य दिलेलं !!
© वृषाली

माझे पुस्तक अनुभव - व्यक्ती आणि वल्ली

मराठी पुस्तकप्रेमी ग्रुप वरील सर्व मित्र-मैत्रिणींना माझा नमस्कार. आजचा माझा पुस्तकानुभव हा अनुभव नसून एक शिकवणमाला आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचे "व्यक्ती आणि वल्ली" हे पुस्तक, खरं तर दहावी मध्ये असतानाच हे संपूर्ण पुस्तक वाचून झालं होत, नि आजवर त्याची कितीतरी पारायण झाली आहेत. पण म्हणतात ना पुस्तक वाचन आणि वाचलेलं पुस्तक समजणं यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. या ग्रुप वर अनुभव लिहायला लागले तेव्हा ते ऐतिहासिक-कादंबऱ्या, पौराणिक-कादंबऱ्या, रसग्रहण याच प्रकारात जास्त लिहलेत. म्हणून यावेळी थोडासा वेगळा प्रयत्न करून पाहिलंय. पु. ल. म्हटलं कि डोळ्यांसमोर उभा राहतो अखंड वाहणारा निर्मल हास्याचा निर्झर. त्यांच्या विनोदी कथांनी लहान मुलांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत सर्वाना वेड लावलंय.
जर एखाद्या लेखकाला त्याची शिकवण लोकांपर्यंत पोहचवायची असेल तर त्याला त्याच साहित्य ऐतिहासिक, पौराणिक, स्वातंत्र्यकथा, कविता, विनोद अशा प्रकारच्या साच्यात बसवायची गरजच पडत नाही मुळात.
एक यशस्वी लेखक तोच असतो जो कोणत्याही प्रकारच्या साहित्यातून आपले चांगले विचार लोकांपर्यंत पोहचवत असतो. पु. लंच्या व्यक्ती आणि वल्लीनी देखील असच वेड लावलं मला. त्यात फक्त विनोद नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला दिलेली शिकवण आहे, सामान्य व्यक्ती तर आपण सगळेच असतो, पण आपल्यातही काही माणसं अशी असतात जी कळत-नकळत आपल्याला बरच काही शिकवून जातात. जीवनाचे धडे देतात, नि अशाच व्यक्ती त्यांच्या वेगळेपणामुळे "वल्ली" म्हणून ओळखल्या जातात. अशाच काही वल्लींची शिकवण मी आज आपल्यासमोर मांडतेय. व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाची हि शिकवणमाला म्हणजे या पुस्तकाचा वेगळ्या अर्थाने मांडलेला अनुभव आहे, आपणा सर्वाना आवडेल अशी अपेक्षा करते.
• हरितात्या - एक इतिहास वेडा माणूस
पु. लंच्या हरितात्यांना वेड होत ते इतिहासाचं. त्यांचं हे वेड आपल्याला नकळत शहाणं करून जात. आयुष्य जगण्यासाठी सुद्धा असच एक वेड असल पाहिजे, आपल्या धेय्याच वेड. आपल्या धेय्याकडे वाटचाल करताना वाटेत अनेक अडचणी येतील पण जे आपल्या सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन नि जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा आपल्या आयुष्यातील एक आवश्यक घटक मानून पुढे चालत राहणे हेच तर जास्त महत्वाचं असत नाही का? आता तुम्ही म्हणाल विरोधक कशाला, विरोधक सुद्धा तेवढेच आवश्यक असतात. आपलं कुठे चुकतंय ते समजायला, जीवनाच्या गाडीला कुठे ना कुठे गतिरोधकांची गरज पडतेच पडते त्याशिवाय जीवनाचा प्रवास सुखकर होत नाही.
हरितात्यांचे सवंगडी म्हणजे लहान मुलं, पण ते लहान मुलांतही लहान मुलं होऊन मिसळायचे. त्यांच्यावर इतिहासकालीन कथांद्वारे चांगले संस्कार करायचे. आपल्या कामातून आपण कुणाचंतरी भलं करतोय, कुणाच्यातरी आयुष्यात एक आवश्यक घटक बनून राहतोय हे का कमी आहे? हरितात्यांसारखेच पुराव्याने शाबीत करण्यासारखे जगूयात नि आपल्या चांगल्या कामाने सर्वांचे मन जिंकूयात.
• नामू परीट - एक स्थितप्रज्ञ
पु. लंच्या नामूला स्थितप्रज्ञ म्हटलंय म्हणजे तो अगदीच भावरहीत, शांत या अर्थानं नव्हे बरं. स्थितप्रज्ञ म्हणजे आल्या परिस्थितीला शांतपणे सामोर जाणारा माणूस, असा अर्थ घेतलाय इथे.
माणसाची परिस्थिती कधीच समान नसते, प्रत्येकालाच चांगल्या-वाईट, गरीब-श्रीमंत, सर्व परिस्थितीतून जावं लागत. अशा परिस्थितीतही न डगमगता उभा राहतो तो माणूस. हीच शिकवण नामू परीट वाचताना मिळते. त्याची परिस्थिती चांगली-वाईट, गरीब-श्रीमंत अशी बदलत जाते, अगदी तो जेल मध्ये सुद्धा जाऊन येतो पण शेवटी सर्व परिस्थितीवर मात करून तो या पांढरपेशा समाजात ताठ मानेन उभा राहतो.
आपल्याकडून एखादी चूक झाली तर त्या चुकीला आपण किती महत्व द्यावं हे आपल्या हातात असत, बहुतेक वेळा आपल्या हातून घडलेल्या वाईट गोष्टी आपण विसरू शकत नाही, किंबहुना कधी कधी समाज त्या गोष्टी आपल्याला विसरू देत नाही. भुतकाळातील अशा गोष्टी विसरून याच चुका परत करू नयेत नि समाजात ताठ मानेन जगायला शिकावं हेच तर सांगतो पु. लंचा नामू आपल्याला.
• नंदा प्रधान - यक्ष
पु. लंचा हा यक्ष मात्र मनावर फार मोठा आघात करून गेलाय. एखादी अशी व्यक्ती ज्यानं आयुष्यात खूप दुःख पाहिलीत, तिला नंदा प्रधान खूप जवळचा वाटेल, अगदी माझ्यासारखाच.
असं म्हणतात कि यक्ष-यक्षिणी खूप सुंदर असतात. आपल्या अस्तित्वाने ते आजूबाजूचं वातावरण देखील सुंदर बनवतात. पण ते स्वतः मात्र आतून खूप दुःखी असतात कारण त्यांच्या आयुष्याला शाप असतात.
नंदाने सुद्धा लहानपणापासून खूपकाही सहन केलेलं असत, खूप काही भोगलेलं असत. आणि म्हणूनच कि काय छोट्या छोट्या सामान्य सुखाचं सुद्धा त्याला अप्रूप वाटत.
आपण सुद्धा कधी कधी मोठं दुःख आल्यावर खचून जातो, जगण्याची उमेद हरवून बसतो, नि त्या दुःखाखालीच चिरडली जातात आपली छोटी छोटी सुख, जी आपल्याला आपल्या व्यथांपुढे दिसूनच येत नाहीत. भलेही त्यांचं अस्तित्व काही क्षणाचं असेल पण असे क्षण आपल्याला जगण्याची उमेद देऊन जात असतात.
त्यामुळे प्रत्येक मोठ्या दुःखातही आपली माणसं, आपले छोटे सुखाचे क्षण कधीच विसरू नयेत. कारण तीच आपली जगण्याची सर्वात मोठी शक्ती असते. प्रत्येक संकटात ती आपल्याला तारून नेते.
• चितळे मास्तर - एक आनंद स्रोत
काही काही माणसं जन्माला येतात तीच मुळात दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी. चितळे मास्तर म्हणजे देखील असाच सदा दुसऱ्यांना आनंद देणारा कल्पवृक्ष. त्यांचं जीवन त्यांनी फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या सेवेसाठी वाहून घेतलं होत.
ओळीत फक्त आठ शब्दच लिहायची सक्ती करणारे, वर्गातल्या मुलांवर स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करणारे चितळे मास्तर मुकुंदाच्या पोलिओ झालेल्या मुलीला गोष्ट सांगताना मनाला हेलावून जातात.
चांगली माणसे पण अशीच असतात त्यांना फक्त दुसऱ्यांना आनंद देणं इतकंच ठाऊक असत. मग त्यासाठी त्यांना वय, स्थळ-काळ-वेळ काहीच आडवं येत नाही. चांगल्या माणसांचा चांगुलपणा त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येतो.
आपणही आपल्या चांगल्या वागण्याने इतरांच्या असच उपयोगी पडलं पाहिजे नाही का? आपल्याला कळणार सुद्धा नाही इतक्या सहजपणे आपण दुसऱ्यांना आनंद देत असतो. जगासाठी भले ती छोटी गोष्ट असो, पण ज्याला तो आनंद मिळालाय त्या माणसासाठी ती जगातली सर्वात मोठी गोष्ट असते. म्हणून नेहमी इतरांना आनंदी ठेवुयात.
• हंड्रेड परसेन्ट पेस्तन काका
पेस्तन काका वाचल्यावर समजलं कि प्रेमाला वयाच बंधन असूच शकत नाही. पेस्तन काकींची पेस्तन काका घेत असलेली काळजी पाहून वाटलं कि प्रेम असावं तर असं.
आपली प्रेमकथा पण ते ज्या दिलखुलासपणे लेखकाला सांगतात ते वाचून वाटत हल्लीच्या काळात नाही सापडायचा असा प्रांजळपणा. लग्नाला साठ वर्ष झाल्यावर सुद्धा She is a very good girl!!!! म्हणायचे ते वाचून प्रेमाची एक नवीन व्याख्या समजली. प्रेम म्हणजे लग्न, मुलं-बाळ, संसार हेच नव्हे, तर प्रेम म्हणजे एकमेकांचा एकमेकांवर असलेला विश्वास. उतारवयात घेतलेली आपल्या जोडीदाराची काळजी. त्यांच्या चांगल्या वाईट सवयींची असलेली जाणीव, नि त्यांना सर्व गुण-दोषांसह स्वीकारणं.
लग्न म्हणजे आपल्या जोडीदारासह आपण आयुष्याची केलेली वाटचाल, चांगल्या काळात मिळालेली त्याची साथ तर वाईट वेळेत असलेला हातात हात. पेस्तनकाकांचं प्रेम सुद्धा त्यांच्या सारखंच शंभर टक्के खरं होत. असच प्रेम आपणही आपल्या माणसांवर करूयात.
या होत्या पु. लंच्या काही वल्ली आणि त्यांची शिकवण. ज्या आपण आत्मसात करूयात आणि आयुष्याला एक नव्या दृष्टिकोनातून बघुयात.

© वृषाली